अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन महिन्यांपूर्वी एका जमावाने आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती.या घटनेतील आरोपी अद्याप अटक नाही.आरोपींना अटक करावी,या मागणीसाठी पिडीत कुटुंबाने गेल्या पाच दिवसांपासून दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.या उपोषणाच्या समर्थनात तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे.या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवारी ३० मे रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २६ मार्च रोजी सुमारे १५ ते २० जणांच्या जमावाने बर्डे नामक आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती.यावेळी जमावाकडून घरातील सामानाची तोडफोड करुन नुकसान करुन एक महिला व एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता.या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सुमारे १९ जणांवर पोक्सो व ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटनेचा तपास उप विभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करीत आहे.मात्र घटनेला दोन महिने उलटूनही अद्याप पर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी पिडीत कुटुंबाने गेल्या पाच दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

आमरण उपोषणासाठी बसलेल्या बर्डे कुटुंबांच्या मागणीची प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी तसेच तपासी अधिकारी उप विभागीय पोलिस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, तसेच पीडित कुटुंबाचे पुनवर्सन करण्यात यावे. या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक ३० मे रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्य महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी कुमार भिंगारे,प्रमोद बर्डे,जयेश माळी,विशाल बर्डे,नाना बर्डे,अनिल पवार,नंदू उल्हारे,शरद साळवे,गनी दिलावर,शिवाजी गोलवाड,एकनाथ बर्डे,बाळासाहेब पवार,राजू भालेराव,रमेश निकम,लक्ष्मण साठे,सुरेश जाधव आदिंसह विविध संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा