कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
पंचवार्षिक निवडणुकीत डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या सत्तेची चावी जनसेवेच्या तनपुरे यांच्या हाती, तनपुरे घराण्याचा चौदा वर्षा वनवास संपला

0
1
6
8
3
4
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : राहुरीची कामधेनू डॉ. बाबुराब बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार मतदान झाल्या नंतर आज सकाळी मतमोजणीस पारंभ झाला. ‘ब’ वर्गाची मतमोजणी पासुन सुरवात करण्यात आली.जनसेवा मंडळाने विजयाचा श्रीगणेशा याच मतदार संघातून झाली.कोल्हार गटा पासून गटाची मतमोजणी सुरु झाल्यावर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारा पेक्षा दोन ते अडीच हजाराच्या फरकाने जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले.जनसेवा मंडळाच्या ताब्यात एक हाथी सत्ता देवून तनपूरे घराण्याचा चौदा वर्षा वनवास संपवला आहे.कारखाना चालू करण्याचा दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद पडलेल्या कारखान्याच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्या आहेत.शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेसह शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचे दाखवूनही सभासदांनी दोन ते अडीच हजाराच्या फरकाने पराभव केला आहे.तर कारखाना बचाव कृती समितीला तीन आकड्यात रोखुन धरत सभासदांनी झिरकडले आहे.जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
दि. ३१ मे रोजी मतदान प्रक्रियात मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पहावयास मिळाला आहे.तब्बल ९ वर्षा नंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर वाहणांची व माणसांची गर्दी पाहवायस मिळाली आहे. २१ हजार सभासद मतदारांपैकी १२हजार ६६२ मतदारांनी तर ‘ब’ वर्गासाठी १९० मतदारांपैकी १८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकुण ५९;४० टक्के मतदान झाले होते.
रविवारी सकाळी मतमोजणीस सुरवात झाली.सुरवातीलाच ‘ब’ वर्गातून हर्ष अरुण तनपुरे विजयी झाल्याने जनसेवा मंडळाचा विजयाचा श्रीगणेशा झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साहा वाढत गेला.गट निहाय मतमोजणीस सुरवात झाल्या नंतर जनसेवा मंडळाने दोन ते अडीच हजाराचा लिड घेतला हा लिड शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला तोडणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर शेतकरी विकास व कारखाना बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळावरुन काढता पाय घेतला.डॉ तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या जनसेवा मंडळाच्या एक हाथी देण्यात आल्या.
बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ, युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत झाली.जनसेवा मंडळाच्या विजया नंतर देवळाली प्रवरात फटाक्याची आतीषबाजीसह डिजेच्या निदनात मिरवणूक काढण्यात आली.
बंद पडलेल्या डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे
कोल्हार गटातून अशोक ज्ञानदेव उऱ्हे ७३२९ (विजयी), ज्ञानेश्वर भास्कर कोळसे ६९०९ (विजयी)
देवळाली प्रवरा गटातून
कृष्णा नानासाहेब मुसमाडे ६७४७ (विजयी), अरुण कोंडीराम ढुस ६८७४ (विजयी),भारत नानासाहेब वारुळे ६५५४ (विजयी)
टाकळीमिया गटातून
मीना सुरेश करपे ७२३७ (विजयी),
ज्ञानेश्वर बळीराम खुळे ७०८१ (विजयी), ज्ञानेश्वर हरी पवार ६२१५ (विजयी)
आरडगाव गटातून
प्रमोद रावसाहेब तारडे ६९८३(विजयी), वैशाली भारत तारडे ६७११(विजयी),सुनील भानुदास मोरे ६७८६ (विजयी)
वांबोरी गटातून किसन कारभारी जवरे ७४२४ (विजयी),भास्कर जगन्नाथ ढोकणे ७३३३ (विजयी)
राहुरी गटातून जनार्दन लक्ष्मण गाडे ६६७४ (विजयी),अरुण बाबुराव तनपुरे ६९४७ (विजयी)
ब वर्ग गटातून हर्ष अरुण तनपुरे १२८ (विजयी)
अनुसूचित जाती जमाती मधून
अरुण नानासाहेब ठोकळे ७२३६ (विजयी)
महिला प्रतिनिधी मधून सपना प्रकाश भुजाडी ६७८६ (विजयी), जनाबाई धोंडीराम सोनवणे ६५६५ (विजयी)
इतर मागास प्रवर्गातून
रावसाहेब यादव तनपुरे ७१२३ (विजयी),
विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून अशोक सिताराम तमनर ७५८७ (विजयी)
प्रांताधिकारी डॉ. किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मतदान मोजणी प्रकियेसाठी परिश्रम घेतले.राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.