अपघातदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
“महाराष्ट्राचा ढाण्या वाघ हरपला… भावपूर्ण श्रद्धांजली” महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला; बारामतीच्या मातीतच अजित पर्वाचे वादळ शमले

0
5
9
3
8
7
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा आणि अफाट कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. नियतीचा हा क्रूर घाला इतका अचानक होता की, अवघ्या महाराष्ट्राला या बातमीने सुन्न करून सोडले आहे. ज्या बारामतीच्या मातीवर त्यांनी जीवापाड प्रेम केले, त्याच बारामतीच्या भूमीत उतरताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
आज (बुधवार, २८ जानेवारी) सकाळी मुंबईवरून बारामतीकडे झेप घेतलेले खाजगी विमान (Learjet 45) बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अपघातग्रस्त झाले. सकाळी ८:४५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजित सभांसाठी दादा आपल्या होमपीचवर येत होते. मात्र, विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे भरकटले आणि काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांसह वैमानिक आणि इतर सहकारी अशा एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.






