अपघातअभिव्यक्तीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
अजित पवार अपघात प्रकरण – एफआयआर (FIR) का दाखल होत नाही? रोहित पवारांचा प्रशासनावर गंभीर प्रश्नांचा भडिमार

0
5
5
5
3
3
बारामती: राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, या मागणीसाठी रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामती पोलीस ठाण्यात तब्बल दोन तास चर्चा करूनही एफआयआर दाखल न झाल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
रोहित पवार यांची प्रमुख मागणी आणि आरोप
१. दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी: डीजीसीएच्या (DGCA) २४ फेब्रुवारीच्या रिपोर्टनुसार, ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी आणि निष्काळजीपणा आढळला आहे. या त्रुटींमुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, हे सिद्ध होत असताना कंपनीवर गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल त्यांनी केला.
२. दोषी अधिकाऱ्यांचा शोध घ्या: विमान उडवण्यास योग्य आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची होती. खराब विमानाला परवानगी देणारे अधिकारी कोण? तसेच नियोजन करणाऱ्या ‘आर,ओ’ (RO) कंपनीच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये विजिबिलिटीची खोटी माहिती देणारे अधिकारी कोण? त्यांच्यावर एफआयआर का नाही?
३. विमान जाणीवपूर्वक दिले की चुकून?: डीजीसीएने व्हीएसआर कंपनीची पाच विमाने ग्राउंड (बंदी) केली आहेत. मग अजित पवारांच्या प्रवासासाठी तेच ‘फॉल्टी’ विमान का निवडले गेले? हा ‘क्रिमिनल कॉन्स्पिरसी’चा (गुन्हेगारी कट) भाग आहे का, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
४. झिरो एफआयआरचा अधिकार: नवीन कायद्यानुसार (BNSS 2023), कोणताही नागरिक कुठेही ‘झिरो एफआयआर’ दाखल करू शकतो. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तो नाकारला आणि आता बारामती पोलीसही टाळाटाळ करत आहेत, यावरून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला.




