Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कोरेगाव भीमा शौर्य दिन: ‘जय भीम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर; कडेकोट पोलीस बंदोबस्तात १५ लाख अनुयायांनी वाहिली मानवंदना

0 6 6 8 7 3

​शिक्रापूर/पेरणे : ​१ जानेवारी रोजी ऐतिहासिक कोरेगाव भीमा शौर्य दिन सोहळा पेरणे (ता. हवेली) येथील विजयस्तंभ परिसरात मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. राज्यभरात कडाक्याची थंडी असूनही त्यास न जुमानता, राज्यासह देशभरातून आलेल्या सुमारे १५ लाख भीमसागर अनुयायांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली. ‘जय भीम’च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

​उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहाटेच उपस्थिती या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच विजयस्तंभास भेट देऊन मानवंदना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मी येथे मानवंदना देण्यासाठी आलो आहे. येथे येणाऱ्या अनुयायांसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीचे दिवस असूनही राज्य सरकारने या सोहळ्यासाठी आवश्यक तो निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला आहे.” यावेळी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात उपस्थित होते.

​पोलीस प्रशासनाचा ‘तगडा’ बंदोबस्त

सन २०१८ चा कटू अनुभव लक्षात घेता, यावर्षी पोलीस प्रशासनाने सुरक्षेमध्ये कोणतीही कसूर सोडली नाही. विजयस्तंभ आणि परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

​सुरक्षा ताफा: ७ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, २७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ६७ पोलीस निरीक्षक, २८३ सहाय्यक पोलीस निरीक्षक व फौजदार, तसेच ३ हजार २८३ पोलीस कर्मचारी.

​विशेष पथके: एसआरपीएफच्या १२ प्लाटून, ५०० स्वयंसेवक, ८ बॉम्बशोधक पथके.

​निगराणी: सुरक्षेसाठी १७२ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला.

​ग्रामस्थांचा आदर्शवत उपक्रम: गुलाबाची फुले देऊन स्वागत

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा ‘आदर्शवत पायंडा’ राबविण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून, यामुळे सामाजिक सलोखा राखण्यास मदत झाल्याचे प्रतिपादन केले.

​शिस्तबद्ध नियोजन आणि महार रेजिमेंटची मानवंदना

विजयस्तंभ परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका (रंगा) तयार केल्या होत्या, ज्यामुळे अनुयायांना सोयीचे झाले. यावर्षीही महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने देण्यात आलेली मानवंदना उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरली.

​हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल गजानन पाटील, रमेश चोपडे, प्रशांत ढोले, दीपरतन गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे