Breaking
अपघातकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वडगाव निंबाळकर येथे शॉर्ट सर्किट; अडीच एकर ऊस जळून खाक, ६ लाखांचे नुकसान!

वीज बिल थकल्यास तत्परतेने वीज तोडणारे महावितरण नुकसानभरपाई देणार का? वडगाव निंबाळकरमधील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

0 8 5 0 1 5

वडगाव निंबाळकर : महावितरणच्या कारभाराचा आणि निष्काळजीपणाचा मोठा फटका वडगाव निंबाळकर येथील शेतकऱ्यांना बसला आहे. १२ फाटा परिसरातील शेती गट नंबर २३/२४ मध्ये विजेची मुख्य तार तुटून पडल्याने झालेल्या भीषण शॉर्ट सर्किटमुळे तब्बल अडीच एकर ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे अंदाजे ६ लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर येथील सचिन सोपान साळवे, त्यांचे चुलते गौतम बाबुराव साळवे आणि महेंद्र राजाभाऊ साळवे यांनी आपल्या शेती गट नंबर २३/२४ मध्ये १४ महिन्यांचे उसाचे पीक मोठ्या कष्टाने जोपासले होते. तोडणीच्या उंबरठ्यावर असलेल्या या पिकावर दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:५० वाजण्याच्या सुमारास अचानक विजेची जिवंत तार तुटून पडली. त्यामुळे जोरदार शॉर्ट सर्किट होऊन उसाच्या शेताने क्षणात पेट घेतला. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की पाहता पाहता अडीच एकरातील उभे पीक पूर्णपणे जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच त्याच दिवशी वडगाव निंबाळकरचे तलाठी श्री. रंधवे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा सविस्तर पंचनामा केला.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. ऋषिकेश (आबा) गायकवाड तसेच चिट बॉय पंडित माने यांनी जळीतग्रस्त शेताची पाहणी केली. त्यांनी या दुर्घटनेची माहिती तत्काळ कारखाना प्रशासनाला कळवली असून, बाधित शेतकरी सभासदांना कारखान्याच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य आणि मदत केली जाईल, असा विश्वास यावेळी दिला.

शेतकऱ्यांचा महावितरणला संतप्त सवाल

एखाद्या ग्राहकाचे किंवा शेतकऱ्याचे केवळ एक-दोन महिन्यांचे वीज बिल थकले तरी महावितरणचे कर्मचारी तत्परतेने वीजपुरवठा खंडित करतात. मात्र, वर्षानुवर्षे लोंबकळणाऱ्या धोकादायक तारांची दुरुस्ती न केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यावर महावितरण भरपाई देण्यासाठी अशीच तत्परता दाखवणार का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण आगीला महावितरणचा हलगर्जीपणाच जबाबदार असून, प्रशासनाने व वीज वितरण कंपनीने पीडित शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे